बंद

    पाणी विभाग आणि स्वच्छता

    पाणी आणि स्वच्छता हे दोन्ही विषय एकमेकांशी संबंधित असल्याने, केंद्र सरकारने २०१२ मध्ये जिल्हा पाणी आणि स्वच्छता विभागाची स्थापना केली आणि या विभागामार्फत, सर्व केंद्र पुरस्कृत कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविले जात आहेत-

    स्वच्छ भारत अभियान (ग्रा.): एसबीएम (ग्रा.)

    लोकसहभागातून देशातील ग्रामीण भागात स्वच्छतेची पातळी आणि व्याप्ती वाढवण्याच्या उदात्त उद्दिष्टाने, केंद्र सरकारने ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पायाभरणी केली. १९९० ते २०००-०१ पर्यंत केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम (सीआरएसपी), २००१ ते २०१० पर्यंत संपूर्ण स्वच्छता मोहीम आणि २०१२ ते २०१४ पर्यंत पावेटोचे निर्मल भारत अभियान आणि त्यापुढे २ ऑक्टोबर २०१४ पासून पंतप्रधानांच्या शुभहस्ते सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) एसबीएम (ग्रा.) प्रगतीपथावर असल्याचे म्हणता येईल. या मोहिमेचा मुख्य उद्देश देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचा अवलंब करणे, उघड्यावर शौचास जाण्याच्या पद्धतीला पूर्णपणे आळा घालणे आणि निरोगी आरोग्य आणि समृद्धीसह शाश्वत विकासाला चालना देणे असे म्हणता येईल. मूलभूत सर्वेक्षण माहिती: २०१२ मध्ये केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार जिल्ह्यात मूलभूत सर्वेक्षण प्रक्रिया राबविण्यात आली आहे आणि सध्या जिल्ह्यातील १३ तहसील क्षेत्रातील कुटुंबांची आकडेवारी खाली नमूद केल्याप्रमाणे समोर आली आहे.